PM धनधान्य कृषी योजना: Dhandhanya Krishi Yojana

PM धनधान्य कृषी योजना: Dhandhanya Krishi Yojana

भारताच्या वित्त मंत्र्यांनी केंद्रीय बजेटमध्ये PM धन धान्य कृषि योजना 2025 ची घोषणा केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील 100 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये शेती उत्पादन वाढवणे हा आहे. सरकारच्या या योजनेचा 1.7 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या अंतर्गत सरकार उच्च दर्जाची बियाणे, खते आणि शेतीसाठी लागणारी आधुनिक उपकरणे अल्प दरात किंवा मोफत पुरवणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे उत्पादन घेता येईल. चला तर मग जाणून घेऊया या योजनेविषयी सर्वकाही.

 

काय आहे PM धनधान्य कृषी योजना (What is PM Dhandhanya Krishi Yojana)?

  • नवीन योजनेच्या माध्यमातून तरुण आणि महिला वर्गावर फोकस करण्यात आलेला आहे. या योजनेमुळे लाभार्थ्यांना घराच्या जवळच रोजगार निर्माण होणार आहे.
  • तूर, उडीद, मसूर डाळींच्या उत्पादनांवर भर देण्यात येणार आहे. या माध्यमातून केंद्र सरकार शेती उत्पादन वाढवून शेतमाल खरेदी करणार आहे.
  • त्यासाठी सरकारने तूर, उडीद आणि मसूरसारख्या डाळींच्या खरेदीसाठी योग्य नियोजन करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी प्राईस सपोर्ट स्कीम आणि प्राईज स्टॅबिलायझेशन फंड याचा उपयोग होणार आहे.
  • केंद्र सरकारने उडीद, तूर आणि मसूर या डाळी शंभर टक्के खरेदी करण्याचं आश्वासन दिलं आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने शेतमाल स्वस्तामध्ये विकण्याची वेळ येणार नाही.
  • इथून पुढे डाळींची विक्री एमएसपीवर किंवा मंडईच्या आसपास करता येईल. यामुळे डाळींना योग्य भाव आणि डाळींचं उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. डाळींचं पिक वाढून आत्मनिर्भर बनण्याचा सरकारचा उद्देश आहे.

 

PM धनधान्य कृषी योजनेची पंचसूत्री:

  • देशातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे.
  • पिकांमध्ये विविधता आणून शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करणे.
  • जिल्हा, तालुका आणि मंडळ स्तरावर साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध करून देणे.
  • शेतकऱ्यांना दीर्घ अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे.
  • शेतीसाठी सिंचन सुविधा उपलब्ध करणे.

 

या योजनेत अर्ज करण्यासाठी पात्रता (Eligibility to apply for this scheme):

  • फक्त भारतीय शेतकरीच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे.
  • योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

 

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे (Required documents for application):

  • या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतील:
  • आधार कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • शेतजमिनीच्या मालकीचे दस्तऐवज
  • बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट साइज फोटो
  • ई-मेल आयडी (असल्यास)
  • मोबाइल नंब

 

  • PM धनधान्य कृषी योजना: Dhandhanya Krishi Yojana

जर तुम्हाला PM धन धान्य कृषि योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर खालीलप्र

माणे अर्ज करता येईल:

  • सर्वप्रथम आपल्या जवळच्या कृषी कार्यालयात भेट द्या.
  • तिथे योजनेच्या अर्जपत्राची मागणी करा.
  • अर्जपत्र मिळाल्यानंतर त्यामध्ये आवश्यक माहिती भरून घ्या.
  • भरलेला अर्ज आणि सर्व आवश्यक कागदपत्रे संलग्न करा.
  • पूर्ण केलेला अर्ज कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करा.
  • तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल आणि योग्य ठरल्यास तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल.

PM धनधान्य कृषी योजना: Dhandhanya Krishi Yojana

More From Author

Samsung ने लॉन्च किया शानदार Samsung Galaxy C55 5G, सिर्फ ₹11,799 में – जानें features.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *